सन २०११ मध्ये केंद्र शासनाने ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानाची सुरुवात केली. महाराष्ट्रातही या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी होत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती अभियानाच्या संचालनासाठी स्थापित आहे, ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या स्वतंत्र संस्थेची स्थापना १८६० च्या संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत करण्यात आली. याच अभियानाला राज्यभर उमेद नावाने ओळख मिळालेली आहे. आज हे अभियान राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये आणि ३५१ तालुक्यांमध्ये राज्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये पूर्ण ताकदीने राबविले जात आहे, ज्यामुळे समुदायांचे जीवनमान उंचावण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.
अधिक माहिती...
Self Help Group (SHG)
स्वयं सहायता समूह
Village Orginazation (VO)
ग्राम संघ
Cluster Level Federation (CLF)
प्रभाग संघ
SHG Members
स्वयं सहायता समूह सदस्य
ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मुलनासाठी महिलांच्या सहभागाने देशभर राबविला जाणारा राष्ट्रव्यापी ध्वजांकित कार्यक्रम आहे. आपल्या राज्यात या कार्यक्रमाचे नाव महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियान नावाने ओळखला जातो. अभियानात सहभागी होण्यासाठी स्वयंसहाय्यता गटात सहभागी होणे अनिवार्य असते. गटामध्ये सहभागी होऊनच महिलांना अभियानासोबत जोडले जाते. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व स्वयंसहाय्यता गटाची चळवळ हि आमेड अभियानाचे मूर्त स्वरूप आहे. या चळवळीतील प्रत्येक महिला उमेद अभियानाचा घटक आहे.
एका स्वयंसहाय्यता गटात किमान 10 आणि कमाल 20 महिलांचा गट तयार केला जातो.
स्वयंसहाय्यता समूह स्थापन करणेसाठी गावातील समुदाय संसाधन व्यक्ती – CRP यांची मदत घ्यावी / संपर्क करावा.
स्वयंसहाय्यता समूह स्थापन झाल्यावर गावातील समुदाय संसाधन व्यक्ती(CRP) / e-book keeper द्वारे LokOS Application वर समूहाची नोंदणी करण्यात येते.







